आळंदी: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर अचूक मिसाईल हल्ले करत 90 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी कारवाईमुळे देशभर आनंदाचं वातावरण आहे. आळंदी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या नेतृत्वाखाली या ऑपरेशनचं स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे आभार मानण्यात आले.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसारण परिसरात दहशतवाद्यांनी 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हिंदू पुरुषांना लक्ष्य करत हत्या करण्यात आली, ज्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान मोदी यांनी “दहशतवाद्यांना पृथ्वीच्या टोकापर्यंत शोधून शिक्षा करू,” असं आश्वासन दिलं होतं.